व्हॉट्सऍप कट्टा   

किती देखणी असतात ना नाती 
टोमण्यांकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी ‘आई’
घोडा घोडा करणारे ‘बाबा’
बाळाला मांडीवर घेऊन बसणारी ‘आत्या‘
न रागावता लाड करणारी ‘मावशी’
’मुलीला मांडवात घेऊन या’चा पुकारा झाल्यावर डोळे भरून येणारे ‘मामा’
माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत
भरल्या आवाजात ’येत जा गं घरी’ म्हणणारी ‘काकू’
नि गाडी वरून फिरवायला नेणारा ‘काका’
सगळी गुपितं विश्वासानं शेअर करणारी ‘मैत्रिण’
आणि ‘बाकी काही तक्रार नाही हो, पण फार कमी जेवते तुमची मुलगी’ असं फोनवर सांगणारी प्रेमळ ‘सासू’,
वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा ‘नवरा’ आणि
’आमटी फक्कड झालीय गं, माझ्या आईची आठवण करून दिलीस’ म्हणणारा ‘सासरा’
ऑफीसातून परतल्यावर ’बस घटकाभर’ म्हणत वाफाळता चहा पाजणारे व आपल्या मुलांचा दंगा खपवून त्यांना सांभाळणारे ‘शेजारी’. चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी ‘पत्नी’
मुलांत मुल होऊन क्रिकेट खेळणारे ‘बाबा’
आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी नातवाला फिरवून आणणारे ‘आबा’. फेसबुकवर चिडवणारा पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा ‘मेहुणा’. इकडे तिकडे पळत हैराण करणार्‍या नातवाला गरमागरम वरण भात मायेने भरवणारी ‘आजी’
या सगळ्या सुख दुःखात सामील होणारा ‘मित्र परिवार’. किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास...! हसत जगा आयुष्य खूप 
सुंदर आहे...
-------
निष्कर्ष
 
दारू मुक्ती केंद्राचा वर्ग सुरू असतो. प्राध्यापक सरांच्या टेबलावर एक व्हिस्कीचा, एक व्होडकाचा, एक रमचा, एक गावठीचा, एक टकिलाचा आणि एक वाईनचा ग्लास ठेवलेला होता. वर्गाचं लक्ष त्या ग्लासकडे लागलंय हे पाहून सरांनी सहा किडे आणले आणि एक एक करून त्या ग्लासात सोडले. सोडताच क्षणी अर्ध्या अर्ध्या मिनिटांच्या फरकाने ते किडे बिचारे तडफडून मरूनच गेले. अचंबित झालेल्या चेहर्‍यांकडे विजयी नजरेने सरांनी तिरपा कटाक्ष टाकला. 
सर : तर.. काय कळलं तुम्हाला यातून? 
गंपू : काय तर काय. सोपं आहे. सर, याचा अर्थ की कोणती पण दारू प्या. पोटातले किडे-जंत मरणार म्हणजे मरणार.
-------
एक भिकारी : मालक एक रुपया द्या... तीन दिवसापासून काही खाल्ले नाही....
काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून बघेन..
किती कमी झालंय ३ दिवसात..
-------
एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्यचकित होत होता. तुमची प्रगती रोखणार्‍या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामील व्हा. सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकार्‍या बद्दल वाईट वाटलं. पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण?
यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला. शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.
कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता. शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता, या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखू शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वत:! कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता. तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच. आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसर्‍याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही. दुसर्‍याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल? तुम्ही तेव्हाच मोठे होऊ शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.
--------
जेव्हा मेहनत करूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, ‘सिद्धांत‘ नाही.
कारण झाड नेहमी ’पान’ बदलतात ’मूळ’ नाही.
भगवद्गीतेत स्पष्ट लिहिले आहे-निराश होऊ नको ’कमजोर’ तुझी वेळ आहे ‘तू‘ नाही!
-------
मागितले तरी सुख उसने मिळत नाही.
प्रयत्नांशिवाय कधीच ध्येयाचे शिखर गाठता येत नाही.
आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा.
‘योग्य वेळी तो एवढं देतो, की मागायला काहीच उरत नाही‘.
--------
दगडाचं तर ठीक आहे हो..... 
थोडा शेंदुर फासला म्हणजे
एकदा देव तरी तयार करता येईल
पण माणसाला असा कोणता रंग द्यावा
म्हणजे माणसाचा
माणूस बनवता येईल?
--------
गर्लफ्रेंड (नाराजीच्या सुरात) : इतका उशीर का झाला? कधीपासून वाट बघतेय.. 
बॉयफ्रेंड : बॉसनं थांबवलं होतं.. त्यांच्यासोबत डिनर करत होतो.. 
गर्लफ्रेंड : काय खाल्लं? 
बॉयफ्रेंड : शिव्या
--------
परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात, बाकी गैरसमज आहे
जेवताना शेतकर्‍याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरू नये
कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरू नका परमेश्वर नेहमी ऑनलाईन  असतो
सॉरी माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो
नातं हृदयातून असावं. रक्ताची नाती हल्ली वृद्धाश्रमात सापडतात
लाकडाच्या ओडक्यांनी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते- झाडे लावा झाडे जगवा
नाती जिवंतपणीच सांभाळा, ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही!
नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते
चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकामा करतो. चमच्यापासून सावध राहा.
उपवास नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा
भावना ही जगातील सर्वांत धोकादायकनदी आहे ह्यात सगळे वाहून जातात
मूर्खाशी कधीच वाद घालू नये. त्याची संख्या १ ने वाढते
--------
सगळेच विषय सांभाळणारी वही ‘रफ’ म्हणून ओळखली जाते, तिला ना सुंदर बाइडिंग असते, ना सुंदर कव्हर...
कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण अशीच अवस्था असते.
-------
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका..
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ
आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नका..

Related Articles